|
नवसास माझी पावेल समाधी ।
धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी ॥४॥
  |
श्री साईबाबांची समाधी म्हणजे सामान्य माणसाची दगडविटांची बांधलेली समाधी कींवा थडगे नाही. ती एका दिव्य पुरुषाची समाधी आहे. आजही श्री साईबाबांचा दिव्य आत्मा या समाधीभोवती निरंतर वास्तव्य करीत आहे. सर्वसाधारणपणे मनुष्य दु:खाच्या, संकटाच्या वेळी देवाला आळवितो, नवस करतो, पण त्याच्या ठिकाणी दृढ भक्तीची तळमळच नसेल, तर त्याला फ़लप्राप्ती होणार नाही. तद्वतच श्री साईबाबांवर दृढ भक्ती आणि निष्ठा असेल तरच मनातील इच्छापुर्ण करण्यास श्री साईंची समाधी यशस्वी होते आणि म्हणूनच बाबा आपल्या पाचव्या वचनात म्हणतात...
|
  |
|
|