| |
नित्य मी जिवंत जाणा हेचि सत्य।
नित्य घ्या प्रचिती अनुभवें ॥५॥
  |
या वचनात फ़ार सखोल अर्थ भरलेला आहे. आत्मा अविनाशी आहे. जुन्या वस्त्रचा आपण त्याग करून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आपला आत्मा हा ऐक देह टाकून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. याप्रमाणे श्री साईबाबांनी आपल्या देहाचा त्याग केला असला तरी त्यांचा दिव्य आत्मा अमर आहे. या सत्य तत्वाचे एकदा भक्ताला आकलन झाले की, त्याला स्वानुभवाने प्रत्येक क्षणी प्रचिती येऊन श्री साईबाबा आपल्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीकडे पहात आहेत, याची पुर्ण जाणीव झाल्यावर त्या भक्ताच्या हातून कधीही अपवित्र कृत्य घडणार नाही. श्री साईबाबा आपल्या सहाव्या वचनाने सर्व जगाला प्रगल्भ आत्मविश्वासाने आव्हान देत आहेत की... |
  |
|
|