|
माझ्या समाधिची पायरी जो चढेल ।
दुख: हे हरेल सर्व त्याचे ॥२॥
  |
काही वेळ अति दु:खाने आपणाला आपला देह देखील नकोसा वाटतो. कोणाला शारीरिक व्याधी असेल, तर कोणाला मानसिक व्याधी असेल, अशा दु:खी मन:स्थितीत केवळ पैसा अथवा सहानभुतीचा आप्तस्वकियांचा शब्द दु:खाचे कधीच निवारण करु शकणार नाही. यासाठी श्रीसद्गुरू साईबाबांनी अशा व्याधीग्रस्त झालेल्या अंत:करणाला धीर दिला आहे. म्हणुनच श्रीसाईबाबांच्या समाधी दर्शनाने दु:ख नाहीसे होते, याचा प्रत्यय आज अखेर कोट्यावधी लोकांना येत आहे व त्यामुळेच कल्पनेबाहेर लोकांची गर्दी शिरडीला बाबांच्या समाधी दर्शनासाठी होत आहे. श्री सद्गुरु साईबाबांचे तिसरे वचन तर भक्तांना मिळालेली अमुल्य देणगीच आहे.
|
  |
|
|