मनुष्य जन्माला येऊन प्रत्येक माणसाने सद्गुरूंच्या चरणी अनन्यभावे शरण जाऊन दयाघन परमेश्वराची ओळख करून घ्यावयास हवी. जो साईंच्या चरणी लीन झाला, त्यांना अनन्यभावे शरण गेला, त्याला बाबांनी असा आशिर्वाद दिला की, त्याच्या जन्माचे सार्थक होईल व तोच भक्त धन्य या बहुमोल उपाधीस पात्र होईल.
या वरिल वचनांची प्रचिती अद्यापही अनेक भक्तांना येत आहे. या वचनांचे महत्व किती आहे व त्यामध्ये किती गहन गूढ अर्थ भरलेला आहे, ही मानवाच्या आकलना पलिकडील गोष्ट आहे.
|