|
माझा जो जाहला कायावाचामनी । तयाचा मी ॠणी सर्व काळ ॥१०॥
  |
ज्या भक्ताने आपले सर्वस्व श्री साईबाबांच्या चरणी वाहिले आहे, त्या भक्ताचे साईबाबा हे सदैव ॠणी राहतात. श्री साईबाबा अशा प्रेमळ, निष्ठावान भक्तांचा उद्धार करण्याचे त्याला सन्मार्ग दाखवून आत्मज्ञानाबरोबर अध्यातमज्ञानाची गोडी लावणे हे आपले पवित्र कर्तव्य समजून त्या भक्ताचे शिष्यत्व पत्करून त्याच्या ॠणातून स्वत:ला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच ते आपल्या शेवटच्या अकराव्या वचनात म्हणतात...
|
  |
|
|